Skip to main content

राज्याच्या शिक्षण विभागात विसंवाद? ; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मंत्र्यांमध्येच परस्परविरोधी मते

प्रतिनिधी:पुणे

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री, राज्य मंडळ आणि शिक्षण राज्यमंत्री परस्पर विरोधी भूमिका मांडत असल्याने शिक्षण विभागात विसंवाद आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे.

राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही राज्य मंडळाने परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची तयारी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनीही परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्याची भूमिका मांडली आहे. मात्र शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. त्यामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्य मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देऊन परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याची मागणी केली आहे. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अध्यापन करून पूर्ण करण्यात आला आहे. चाचणी परीक्षा, सत्र परीक्षाही झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लेखन कमी झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत वेळ वाढवून देण्याची घोषणाही आधीच करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि उजळणीसाठी महिन्यभराचा कालावधी आहे. अचानक मूल्यमापन पद्धतीत बदल करणे चुकीचे आहे, परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्यास राज्याच्या काही भागातील कडक उन्हाळा, काही भागातील अवकाळी पावसाची शक्यता विचारात घेतली पाहिजे.त्यामुळे परीक्षा वेळापत्रकानुसारच घ्याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...